निर्भीडसत्ता न्यूज –
पुण्यातील हडपसरमध्ये राहणाऱ्या दोन कुटुंबातील सातजण बेपत्ता आहेत या बातमीने खळबळ उडाली होती. परंतु, बेपत्ता असलेल्या सातजणांचा शोध लागला असून मोबाइलला रेंज नसल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी आणि पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला.
सिध्दार्थ उर्फ हरीष सदाशिव मगर (वय 38), सौ स्नेहल उर्फ ईश्वरी हरीश मगर, त्यांच्या पाच वर्षाच्या जुळ्या मुली – आरंभी आणि सायली, जगन्नाथ हरी सातव, त्यांची पत्नी आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा असे हे पाच जण पानशेत धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते.
केवळ रेंज नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडला असल्याचे हवेलीचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले.