निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्र व देशभरात पत्रकारांवर हल्ले होत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात पत्रकारांना झालेली मारहाण लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. स्वातंत्र्यसंग्रामापासून ते स्वातंत्र्योत्तर काळात पत्रकारांनी देश व समाजाच्या विकासात्मक वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. सातत्याने धमक्या दिल्या जाताहेत. पत्रकारांच्यावरील हल्ले वाढत आहेत. अशा हल्लेखोरांवर वेळीच कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. नुकतेच एका टीव्ही चॅनेलच्या प्रतिनिधीवर हल्ला करण्यात आला. या व इतर झालेल्या हल्ल्याचा संभाजी बिग्रेडकडून निषेध करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हा निषेध करण्यात आला. या वेळी हल्ले करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली.
संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सतिश काळे, मानव कांबळे, मारुती भापकर, प्रकाश जाधव, विशाल तुळवे, प्रदीप पवार, प्रमोद गोतारणे, राजेंद्र देवकर, लहु लांडगे, धम्मराज साळवे आदीसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
प्रसार माध्यमातील प्रतिनिधींना व पत्रकारांना संरक्षण मिळावे. त्यांना धमक्या देणार्या गुंडावर तत्काळ कारवाई करावी. पुरोगामी विचारवंतांना धमक्या देणार्या व त्यांच्या हत्या करण्याच्या कटात सहभागी असणार्यांना देशद्रोही घोषित करून त्यांच्यावर कारवाई करावी. हत्येमागील मास्टर माईंड शोधावेत. श्रीमंत कोकाटे व न्यायमुर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
सतिश काळे, अंतिम जाधव, ज्ञानेश्वर लोभे, सतिश कदम, सिद्धार्थ शिवसरण, जयेश दाभाडे, भैयासाहेब गजधने, संतोष बादाडे, अजय लोंढे, रशीद सय्यद, मुकेश बोबडे आदींनी संयोजन केले.