निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरीतील जय हिंद शाळेने ज्युनियर केजीतील एका विद्यार्थ्याला नापास करून त्याचा शाळेचा दाखला काढून नेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांवर दबाव वाढवला आहे अशी बातमी निर्भीडसत्ता या वेब पोर्टने शुक्रवारी (दि. ७) प्रसिद्ध केली होती. जयहिंद शाळेच्या प्रशासनाने याची दाखल घेत शाळेच्या प्राचार्या जोतिका मलकानी, जोशी सर यांनी राजेश रोचीरमानी यांच्या मुलाला सोमवारपासून शाळेत येण्यास सांगितले आहे.
पिंपरीत राहणाऱ्या राजेश रोचीरमानी यांनी आपल्या मुलाला घेऊन संपूर्ण कुटुंबासोबत शाळेसमोरच उपोषण सुरू केले होते. मुख्याध्यापिका त्यांच्या मुलाला शाळेत येऊ देत नसल्याने उपोषण करण्यात आले होते मात्र आज शनिवारी (दि ८) जयहिंद शाळेच्या प्रशासनाने रोचीरमानी यांच्या मुलाला सोमवारपासून शाळेत येण्यास सांगितले. त्यानंतर रोचीरमानी आणि त्यांची पत्नी आणि मुलगा यांनी उपोषणाला मागे घेतले.
दरम्यान रोचीरमानी आणि त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळला होता. शाळेचा दाखला काढून घेऊन जावा यासाठी मुख्याध्यापिका व्ही. राजमाता राजेश रोचीरमानी या पालकास दबाव टाकत आहे. या दबावाला न जुगारता रोचीरमानी यांनी आपल्या मुलाचा शाळेतून दाखला काढून घेतला नाही म्हणून त्यांना संपूर्ण कुटुंबासोबत उपोषण करावे लागले होते. अखेर त्या मुलाला न्याय मिळाल्याने पिंपरीतील इतर पालकांमध्ये उत्साह वाढला आहे.