पुणे : होळी हा रंगांची उधळण करणारा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग, व्देष विसरून एकमेकांना रंग, गुलाल लावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. ह्या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत. होळीच्या दि
वशी रात्री होळी जाळली जाते या मागे एक आख्यायिका आहे.
राजा हिरण्यकश्यप हा स्वतःला देव समजत असे, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. राजाने भक्त प्रल्हाद ला विष्णु भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हादने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. शेवटी राजाने प्रल्हादला मारण्यासाठी बहिण होलीकाची मदत घेतली. होळीकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त झालेले होते. त्यानुसार राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादला आपल्या मांडीवरबसवून अग्नित प्रवेश केला. परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होळीका भस्म झाली. या कथेमधून हा संकेत मिळतो कि वाईटावर चांगल्याच विजय होतोच. आजतागायत फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. हा एक रंगाचा सण आहे. त्यामुळे या दिवशी सगळीकडे रंगाची उधळण केली जाते. प्राचीन काळापासून आजपर्यंत ही होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाते. मात्र, यंदा राज्यावर पाण्याचे भीषण संकट ओढावल्यामुळे पाण्याचा वापर न करता होळी रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आज आपण पाण्याचा अपव्यय टाळला तर ज्यांना याची जास्त गरज आहे त्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर न करता यंदाची होळी साजरी करा…एवढीच आमची माफक अपेक्षा आहे… होळीच्या सर्वांना शुभेच्छा…