निर्भीडसत्ता न्यूज –
स्वाईन फ्लु या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या शहरातील नागरीकाच्या परिवाराला प्रत्येकी पाच लाख रु मदत द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांनी केली आहे.
गायके यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात आपल्या व वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या चुकीमुळे स्वाईन फ्लु चे प्रमाण वाढुन अनेक गरीब नागरीकांचे प्राण गेले आहेत. त्यांच्या परिवाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्या परिवाराची आपला माणुसही गेला आणि पैसाही गेला त्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. काहीनी तर आपल्या दवाखाण्यावर विश्वास नसल्यामुळे खाजगी दवाखाण्यात कर्ज काढुन उपचार घेतले आहेत. तेथे पण त्याच्या हाती पेशंट लागला नाही.
आम्ही सर्व नागरीक वेळेत कर भरतो. आम्हाला पण वेळेतच आरोग्याची सोय वेळेतच केली गेली पाहीजे. नागरीक आत्ता गप्प बसणार नाहीत, तुमच्या गाडया अडवतील, तुमच्या घरावर धडक मारतील नागरीक फार भडकले आहेत. तुमचे वैदयकीय अधिकारी व कर्मचारी फुकटचा पगार घेवुन फार मुजोर झाले आहेत. ते फक्त पगारा पुरते काम करत आहे,त्यांना नागरीकांचे काही घेणे देणे नाही.
असो परंतु आमची अशी मागणी आहे कि शहरात स्वाईन फ्लु ने जे नागरीक मरण पावले आहेत त्यांच्या प्रत्येक परिवाराला महानगर पालीकेच्या वतीने पाच लाखाची मदत केली गेली पाहीजे, असे संजय गायके यांनी निवेदनात म्हटले आहे.