‘माती, पंख, आकाश’चे उद्घाटन : देशाच्या विकासासाठी सीमा ओलांडण्याची गरज
निर्भीडसत्ता न्यूज –
रोजगार आणि शिक्षण संधीसाठी भारतीय विद्यार्थी मोठ्या सं‘येने परदेशात जात आहेत. ही समाधानाची बाब आहे. स्वतःचा गाव, राज्य आणि देशाच्या विकासासाठी सीमा ओलांडण्याची गरज आहे. त्यासाठी पासपोर्ट हे सीमोल्लंघनाचे खरे प्रतिक आहे असे मत परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच सहजपणे पासपोर्ट मिळावेत यासाठी नवभारत निर्मितीने सुरू केलेल्या ‘माती, पंख, आकाश’ या उपक‘माचे उद्घाटन परराष्ट्र सचिव मुळे यांच्या हस्ते स. प. महाविद्यालयात करण्यात आले. त्यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. सावित्रीबाई ङ्गुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर अध्यक्षस्थानी होते. कार्यक‘माचे संयोजक व नवभारत निर्मितीचे समन्वयक योगेश गोगावले, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, प्राचार्य डॉ. दीलीप सेठ, नगरसेवक दीपक पोटे, सतीश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुळे म्हणाले, सध्यात देशाची लोकसं‘या १२५ कोटी असून केवळ ८ कोटी नागरिकांकडे पासपोर्ट आहेत. दरवर्षी पासपोर्ट विभागाच्या वतीने १ कोटी १० लाख पासपोर्ट वितरीत केले जातात. दररोज सुमारे ६० हजार पासपोर्ट वितरीत होतात. हे प्रमाण खूपच कमी असून पासपोर्टबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. सध्याचे राजकारण संकुचित आहे. धर्मकारणाला राजकारणाची जोड दिली जाते. त्यामुळे संकुचित विचारांचे डबके तयार झाले असून त्यामुळे आपली प्रगती खुंटली आहे. पासपोर्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध देशांमधील संस्कृती, सामाजिक, राजकीय परिस्थिती समजून घ्यावी. ज्ञानाच्या वाटा शोधण्यास उपयोगी म्हणून पासपोर्टचे महत्व आहे.
माती, पंख आणि आकाश ही योजना शहरातील सर्व महाविद्यालयात राबविण्यात येणार आहे. ओळखीचा पुुरावा, पत्त्याचा पुरावा आणि शिक्षण संस्थेतील ओळखपत्र ही कागदपत्रे उपलब्ध असतील तर पंधरा दिवसात पासपोर्ट मिळू शकेल. पासपोर्ट कार्यालयात मुलाखतीची वेळ महाविद्यालयात निश्चित केली जाईल. या योजनेनुसार किमान दहा हजार विद्यार्थ्यांना पासपोर्ट मिळवून दिला जाईल असे गोगावले यांनी सांगितले. डॉ. एस. के. जैन, प्राचार्य सेठ यांची भाषणे झाली. तन्वी थळे हिने सूत्रसंचालन केले, डॉ. शालिनी गुलदेवकर यांनी आभार मानले.