जगात नेत्रदान हे एकमेव असे श्रेष्ठ पुण्यकर्म आहे जे आपल्या मृत्यूनंतर पूर्ण होते. भारतातील १० लाख अंध लोक ही सृष्टी पाहण्यासाठी व्याकूळ आहेत, उत्सुक आहेत. आपण त्यांच्या आर्त हाकेला प्रतिसाद देऊयात. ‘नेत्रदान’ ही आपल्या समाजाची एक श्रेष्ठ परंपरा निर्माण करूयात. आपल्यासारख्या पुण्यात्म्यांच्या निर्जीव देहातील डोळ्यांमुळे अंध व्यक्तींचे जीवन खऱ्या अर्थाने आपण प्रकाशमय करू शकता. मृत्यूनंतर निष्क्रिय व निर्जीव शरीरातील ‘नेत्र’ या अवयवच सत्कारणी उपयोग करूयात.