निर्भीडसत्ता न्यूज –
मुसळधार पावसामुळे पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजची सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत सहाजण मृत्युमुखी पडले असून चारजण जखमी झाले आहेत. तब्बल 15 जणांचा बळी घेणारी कोंढव्याची दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती आंबेगाव येथे घडली आहे. त्यामुळे पुण्यात नक्की चाललय तरी काय अशी ओरड होत आहे.
आंबेगाव येथील सिंहगड कॅम्पसच्या सीमाभिंतीलगत मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना हा सीमाभिंत अचानक कोसळली आणि त्याखाली मजुरांच्या झोपड्या गाडल्या गेल्या. पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली मजूर आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडले.
या घटनेत राधेलाल पटेल(25), जेटू लाल पटेल (50), ममता राधेलाल पटेल (22), जितू चंदन रवते (24), जेटूलाल पटेल(45), ममता पटेल (24) अशी मयतांचे नावे आहेत.