निर्भीडसत्ता न्यूज –
सत्ताधारी भाजप व ढिसाळ पालिका प्रशासनामुळे पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या महिन्याभरापासून कचरा समस्या कायम आहे. पावसाच्या पाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचरा समस्या तातडीने मार्गी लावून शहर स्वच्छ करावे, अशी मागणी समाजवादी पार्टीने पालिकेकडे केली आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी सदर निवेदन आयुक्त श्रावण हर्डीकर यांना गुरूवारी (दि.1) दिले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कचरा गोळा करून तो मोशी येथील कचरा डेपोपर्यंत वाहतुक करून डंपींग करण्याची निविदा बी.व्ही.जी. इंडिया आणि ए. जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्टस या दोन ठेकेदार कंपन्यांना फेबु्रवारी 2019 ला मंजुर झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात काम 4 महिने विलंबाने 1 जुलैपासून सुरू झाले आहे. सदर ठेका वाढीव दराने तब्बल 8 वर्षे कालावधीसाठी मंजुरीवरून सत्ताधार्यांनी ‘टक्केवारी’चा खेळ केल्याचा आरोप कुरेशी यांनी केला आहे.
ठेकेदारांनी स्वत:ची 100 टक्के वाहने खरेदी करून कचरा संकलनाचे काम करण्याचे निविदा अटीत नमूद आहे. मात्र, अद्याप ठेकेदारांची 100 टक्के सर्व वाहने रस्त्यावर आलेली नाहीत. तसेच, घंटागाडीवरील एक कामगार कमी केला आहे. या कारणांमुळे शहरातील काही भागांतील दररोजचा कचरा उचलला जात नसल्याने चित्र आहे. सत्ताधार्यांच्या चुकांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही, साचलेला कचरा पाहणी दौरा काढले जात आहेत. तसेच, बैठकांवर बैठका घेऊन प्रशासनासह ठेकेदारांवर आरोप करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
ठेकेदारांसोबतच्या करारनाम्यानुसार काम चालू झाल्यापासून 6 महिने ठेकेदारावर कारवाई करता येत नाही. त्यामुळे प्रशासन निव्वळ नोटीसा बजावण्याचे काम करीत आहे. हे प्रकार थांबवून शहर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. संपूर्ण शहर स्वच्छ करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा कुरेशी यांनी दिला आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी सदर निवेदन आयुक्त श्रावण हर्डीकर यांना गुरूवारी (दि.1) दिले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कचरा गोळा करून तो मोशी येथील कचरा डेपोपर्यंत वाहतुक करून डंपींग करण्याची निविदा बी.व्ही.जी. इंडिया आणि ए. जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्टस या दोन ठेकेदार कंपन्यांना फेबु्रवारी 2019 ला मंजुर झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात काम 4 महिने विलंबाने 1 जुलैपासून सुरू झाले आहे. सदर ठेका वाढीव दराने तब्बल 8 वर्षे कालावधीसाठी मंजुरीवरून सत्ताधार्यांनी ‘टक्केवारी’चा खेळ केल्याचा आरोप कुरेशी यांनी केला आहे.
ठेकेदारांनी स्वत:ची 100 टक्के वाहने खरेदी करून कचरा संकलनाचे काम करण्याचे निविदा अटीत नमूद आहे. मात्र, अद्याप ठेकेदारांची 100 टक्के सर्व वाहने रस्त्यावर आलेली नाहीत. तसेच, घंटागाडीवरील एक कामगार कमी केला आहे. या कारणांमुळे शहरातील काही भागांतील दररोजचा कचरा उचलला जात नसल्याने चित्र आहे. सत्ताधार्यांच्या चुकांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही, साचलेला कचरा पाहणी दौरा काढले जात आहेत. तसेच, बैठकांवर बैठका घेऊन प्रशासनासह ठेकेदारांवर आरोप करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
ठेकेदारांसोबतच्या करारनाम्यानुसार काम चालू झाल्यापासून 6 महिने ठेकेदारावर कारवाई करता येत नाही. त्यामुळे प्रशासन निव्वळ नोटीसा बजावण्याचे काम करीत आहे. हे प्रकार थांबवून शहर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. संपूर्ण शहर स्वच्छ करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा कुरेशी यांनी दिला आहे.