निर्भीडसत्ता न्यूज –
गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने दोन्ही पक्षाचा एकही आमदार शहरातून निवडून आला नाही. महापालिका निवडणुकीतही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36 नगरसेवक निवडून आले तर दुसरीकडे कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. यामुळे कॉंग्रेसचे शहरातील अस्तित्व धोक्यात आले होते. जर विधानसभा निवडणुकीत एकही जागा कॉंग्रेसला दिली नाही तर शहरातील कॉंग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी भीती ज्येष्ठ कार्यकर्त्यांना वाटत आहे.
काळेवाडी येथे रविवारी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील तीनही मतदारसंघात आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस लढविणार असल्याचे घोषित केले. या घोषणेचे तीव्र पडसाद कॉंग्रेसच्या गोटात उमटले आहेत.