निर्भीडसत्ता न्यूज –
राजकारणात स्वतःसाठी पैसे कमावणारे भरपूर आहेत. मात्र, सुनील शेळके यांच्याकडे स्वतः पदरमोड करून विकासकामे करण्याची दानत आहे. मावळचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शेळकेंनाच प्रचंड मताधिक्याने निवडून आणा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश खांडगे यांनी केले.
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांचा आंदर मावळ भागाचा प्रचारदौरा बुधवारी झाला. टाकवे गावापासून प्रचार दौऱ्यास सुरूवात झाली. फळणे, माऊ, दवणेवाडी, गभालेवाडी, मोरमारेवाडी, डोंगरगाववाडी, वडेश्वर, शिंदेवाडी, घाटेवाडी, नागाथली, वहाणगाव, कुसवली आदी गावांना सुनीलआण्णांनी भेट दिली. मतदारांशी सुसंवाद साधत त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या. या पार्श्वभूमीवर वाहनगाव येथे नगरसेवक खांडगे बोलत होते.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, 25 वर्षापासून मावळचा विकास खुंटला आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. युवकांच्या हाताला काम नाही. महिलावर्गाची मोठ्या प्रमाणावर सक्षमीकरण झाले पाहिजे. तालुक्यातील प्रत्येक माय-भगिनीला न्याय मिळाला पाहिजे. कोणाच्याही भूल-थापांना बळी पडू नका. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे मावळ तालुक्याचा विकास झाला नाही. मात्र, हि निवडणूक म्हणजे सुवर्णसंधी आहे. सुनील शेळकेंच्या रूपाने एक चांगले नेतृत्व उदयास आले आहे. मावळवासीयांना नवा सूर्य पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे न भूतो, न भविष्यती अशा अभूतपूर्व मताधिक्याने सुनील शेळकेच निवडून येणार, असा ठाम विश्वास खांडगे यांनी व्यक्त केला.