निर्भीडसत्ता न्यूज ।
जमीनचे तुकडे केल्यास 100टक्केऐवजी केवळ 30 टक्के मोबदला दिल्याने शेतकरी व जागामालकांवर अन्याय होणार आहे. सत्ताधारी भाजपने आकसापोटी स्थायी समितीमध्ये हा निर्णय घेतला आहे. असा आरोप सभेत करण्यात आला.
त्यावर अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले की, अधिक लाभ मिळावा म्हणून जागामालक जमीनचे तुकडे करून महापालिकेकडे नुकसान भरपाई मागतात. त्यामुळे पालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक रक्कम अदा करावी लागते. त्यात पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे 2015 नंतर 300 चौरस मीटर जागेचे तुकडे केल्यास त्या मोबदल्यात 30 टक्केच दिलासा रक्कम दिल्यास पालिकेची बचत होणार आहे.
या निर्णयावर शिवसेनेचे गटनेते व समितीचे सदस्य राहुल कलाटे यांनी टीका केली. ते म्हणाले की, जागामालकांना केवळ 30 टक्के रक्कम दिल्याने ते महापालिकेस जागा देण्यास तयार होणार नाहीत. त्यामुळे महापालिकेची विकासकामे रखडणार आहे. त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होणार आहे. हे रोखण्यासाठी शेतकरी व जागामालकांना तत्काळ दिलासा रक्कम दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली. भाजपच्या एका नेत्यांच्या सांगण्यावरून स्थायीस समितीचे अध्यक्ष मडिगेरी हा निर्णय घेत असल्याचा आरोप कलाटे यांनी केला. तसेच, सदस्यांना सभेत बोलू दिले जात नाही, असा आरोतही त्यांनी केला.