निर्भीडसत्ता न्यूज –
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेले आहे. “आपण मुलांना मिशनरींच्या शाळेत शिकवतो त्यामुळे ते पुढे जाऊन गोमांस खातात” असं त्यांनी वक्तव्य केले आहे. सिंह म्हणाले, “शाळांमध्ये मुलांना भगवतगीता शिकवायला हवी आहे. मात्र, आपण आपल्या मुलांना मिशनरींच्या शाळांमध्ये टाकतो. त्यानंतर ते आयआयटीमध्ये शिकतात, इंजिनिअर होतात आणि नंतर परदेशात जातात आणि यांच्यापैकी बहुतेक जण गोमांस खातात, का? कारण आपण त्यांना आपली संस्कृती आणि पारंपारिक मुल्ये शिकवत नाही.”