सातारा । शिरवळ मृत्यूचे दार असलेल्या खंबाटकी घाटामध्ये एस काँर्नरवर बोअरवेलच्या गाडीचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्याने गाडी पलटी होऊन तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर आठ ते दहा जण गंभीर जखमी आहेत. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातामुळे घाटामध्ये बऱ्याच वेळ ट्राफीक जाम झाले होते.
ट्रकमधील लोखंडी पाईप व कठड्याच्यामध्ये सर्व कामगार जखमी झाले. तीन जण गाडीखाली सापडल्याने जागीच ठार झाले. खंडाळा पोलीस, महामार्ग पोलीस यांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला घेऊन मृत व जखमींना बाहेर काढले. जखमींना अधिक उपचारासाठी सातारा येथे हलवण्यात आले आहे.