मुंबई | राजगृह ही आमची अस्मिता आहे त्यावर हल्ला सहन केला जाणार नाही. आमचे सर्व मतभेद बाजुला सारून आम्ही राजगृहाच्या मुद्द्यावर एकत्र आंबेडकर कुटुंबियांसोबत आहोत, असे भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ याठिकाणी जाऊन आठवले यांनी आनंदराज आंबेडकर यांची शुक्रवारी भेट घेतली.
आठवले म्हणाले की, राजगृह हल्ला प्रकरणी सुत्रधाराला अटक केली पाहिजे. त्यासाठी सीआयडी मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे. राजगृह हल्ला प्रकरणी कोणीही राजकारण करू नये. राजगृहाच्या संरक्षणासाठी पोलीस चौकी उभारावी, अशी मागणीही आठवले यांनी केली आहे.