निर्भीडसत्ता न्यूज –
बहीण-भावाचे नाते हे रक्ताचेच असावेत असा नियम नाही. राखीचा एक नाजूक धागाही हे नातं घट्ट करते. आज लाखो अनाथ मुलं नात्यांच्या शोधात आहेत. या नाजूक रेशीमगाठीने त्यांना आपलं करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा अशी भावना वेणू साबळे यांनी व्यक्त केली.
अनाथाश्रमातील अनेक बहिणींना भाऊ नाही, तर भावांनाही राखीचा पवित्र धागा बांधण्यासाठी बहीण नाही. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने वाल्हेकरवाडी येथील नचिकेत अनाथआश्रम येथे बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करण्याच्या हेतूने रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा चिटणीस राधिका बोर्लीकर, रेखा कडाली, महिला मोर्चा पदाधिकारी माधवी इनामदार या उपस्थित होत्या.
अनाथाश्रमात राहत असलेल्या मुला-मुलींबाबत आदर निर्माण करावा आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे चार क्षण फुलवण्यासाठी रक्षाबंधन साजरा केला. या कार्यक्रमात महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अनाथाश्रमातील मुलांना राखी बांधली. या वेळी उपस्थित मुला-मुलींना खाऊ देण्यात आला.