निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहराला जास्तीचे पाणी देण्यास मुंबईतील कालावा समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली आहे. ठरवून दिलेल्या पाणी आरक्षणापेक्षा अधिक पाणी पवना धरणातून घेण्यास राज्य शासनाने तयारी दर्शविल्याने शहराला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
कालवा समितीची बैठक आज (शुक्रवारी) मुंबईमध्ये झाली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही तयारी दर्शविली. बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर उपस्थित होते. शहराला दररोज मंजूर 470 एमएलडी पाणी आरक्षणापेक्षा अधिक ३० एमएलटी पाणी गरजेचे असल्याचे पालिकेने सांगितले. त्यावर काही दिवसांसाठी 500 एमएलडी पाणी उचलण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. मंजुरी देता पाणी गळती रोखण्याच्या व जपून पाणी वापराबाबत सुचूना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.