निर्भीडसत्ता न्यूज –
नवी दिल्ली – सार्वत्रिक निवडणुकीपुर्वी मोदी सरकारकडून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा देशभरातील नोकरदार वर्गाला होती. परंतु, २०१८-१९ वर्षाच्या अर्थसंकल्पात त्यांची निराशा झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वैयक्तिक कररचनेत कोणताही बदल केलेला नाही. बिलांवरील एक टक्का अधिभार (सेस) वाढविला असून ३ टक्क्यावरून ४ टक्के केला आहे. दुसरीकडे ग्रामीण अर्थव्यवस्थेबरोबर शेतकरी, गरीबांसाठी काही योजनांची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक मुद्दे –
* राष्ट्रपतींचा पगार प्रति महिना ५ लाख, उपराष्ट्रपतींचा ४ लाख आणि राज्यपालांना ३ लाख रुपये
* खासदारांचा पगार एप्रिल २०१८ पासून वाढणार, दर पाच वर्षांनी महागाई दरानुसार पगार वाढत जाणार
* टीव्ही, मोबाईल महागणार र काजू उद्योगला दिलासा
* २५० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांचा कॉर्पोरेट कर २५ टक्के
* अडीच लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त उत्पन्न, अडीच ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर, पाच ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के, १० लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के
* नोकरदार वर्गाच्या पदरी निराशाच, टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही
* या वर्षी ८.२७ कोटी लोकांनी कर भरला, गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ लाख करदाते वाढले
* इन्कम टॅक्सचा समावेश असलेल्या प्रत्यक्ष करात १८.७ टक्क्यांनी वाढ
* १ लाख ग्राम पंचायतींचा ऑप्टिक फायबर केबलने जोडणार, ग्रामीण भागात ५ लाख ठिकाणी वाय- फाय सेवा सुरु करणार
* उडान योजनेअंतर्गत वापरात नसलेले ५६ विमानतळ आणि ३१ हेलिपॅड जोडणार
* विमानतळांची संख्या पाच टक्क्यांनी वाढवणार
* बडोद्यात रेल्वे विद्यापीठ सुरु करणार
* ३६०० किमीची ट्रॅक नव्याने बांधण्याचे काम हाती घेतले
* मुंबई लोकलवरील नवीन मार्गांसाठी ४० हजार कोटी रुपयांची तरतुद, एलिव्हेटेड मार्गाचाही यात समावेश
* देशभरात ६०० नव्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करणार
* रेल्वेसाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतुद
* आगामी चार वर्षात शाळांच्या विकासावर १ लाख कोटी रुपये खर्च करणार
* अमृत योजनेअंतर्गत ५०० शहरांना शुद्ध पाणी पुरवणार
* कृषी कर्जासाठी ११ लाख कोटी रुपये
* फूड प्रोसेसिंगसाठी १४०० कोटी रुपये
* मत्स्योत्पादन आणि पशूपालनासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतुद
* कृषी उत्पन्न बाजार समितींच्या विकासासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद
* बांबू शेतीच्या विकासासाठी १,२९० कोटी रुपयांची तरतुद
* शेतमालाचे मार्केटिंग करण्याची गरज असून यासाठी कृषी आणि वाणिज्य मंत्रालय संयुक्तपणे प्रयत्न करतील
* शेतकरी, गरीब वर्गांसाठी अनेक योजना सुरु केल्या
* आदिवासी मुलांसाठी एकलव्य शाळा
* शिक्षणाचा दर्जा हा अजूनही चिंतेचा विषय आहे, १३ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार, डिजिटल शिक्षणावर भर
* २,६०० कोटी रुपये देशात सर्वात कमी सिंचन असलेल्या जिल्ह्यासाठी
* स्वच्छ भारतच्या माध्यमातून ६ कोटी शौचालयाची निर्मिती, आता आणखी २ कोटी शौचालय बांधणार
* मध्यमवर्ग आणि गरीब केंद्र सरकारच्या केंद्रस्थानी आहेत, ८ कोटी महिलांना मोफत गॅसजोडणी देणार
* क्षयरोग रोखण्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद
* देशभरात २४ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक मोठे रुग्णालय
* १० कोटी गरीब कुटुंबांसाठी आरोग्य योजना जाहीर करण्यात आली असून ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असेल; जेटलींचा दावा
* आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आयुषमान भारत योजना राबवणार
* पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील तिसरा टप्प्याची अंमलबजावणी करणार: जेटली
* शेतकऱ्यांना उत्पादन मुल्याच्या दीडपट हमीभाव, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार: जेटली
* शेतकऱ्यांच्या अथक मेहनतीमुळे कृषी उत्पन्न दर विक्रमी स्तरावर: जेटली
* अर्थव्यवस्थेचा विकास दर ८ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची आशा: जेटली
* व्यवसायपूरक देशांच्या यादीत भारताची आगेकूच: जेटली
* जीएसटीमुळे अप्रत्यक्ष करप्रणाली सोपी झाली: जेटली
* मोदी सरकारच्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला गती: जेटली
* गरिबी दूर करुन सर्व घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न: जेटली