निर्भीडसत्ता न्यूज –
ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यामुळे देशातील एकूण २० राज्यांमध्ये भाजपची सत्ता निर्माण झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आज (शनिवारी) पिंपरीतील आंबेडकर चौकात जल्लोष साजरा करून पेढे वाटण्यात आले. तसेच यावेळी गुलाल उधळून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
त्रिपुरा, नागालँड, मेघालय या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचा आज (शनिवारी) निकाल लागला. त्यामध्ये त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांत भाजपने विजय मिळविला आहे. तसेच मेघालयमध्येही भाजप सत्ता स्थापणार आहे. त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यामुळे भाजपची देशातील एकूण २० राज्यांत आजमितीला सत्ता निर्माण झाली आहे.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, भाजप शहर सरचिटणीस प्रमोद निसळ, अमोल थोरात, सारंग कामतेकर, संजय मंगोडेकर, प्रदेश सचिव उमा खापरे, प्रदेश पदाधिकारी राजेश पिल्ले, सदाशिव खाडे, अमर मुलचंदानी, महेश कुलकर्णी, स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका ममता गायकवाड, आशा शेंडगे- धायगुडे, कैलास बारणे, रामकृष्ण राणे आदी उपस्थित होते.