निर्भीडसत्ता न्यूज –
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची सर्व नागरिकांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका आहे. मात्र, आदरणीय लोकनेते शरद पवार यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याबाबत कार्यकर्ते कमी पडले. विरोधकांच्या खोट्या भूलथापा व आश्वासनांना मतदार भुलले. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. पुढील काळात खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसह जास्तीत जास्त नागरिकांना सोशल मिडीया वापरण्याबाबत जनजागृती शिबीरे आयोजित करण्यात येतील. त्याचा लाभ घ्यावा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विचार सोशल मिडीयासारख्या प्रभावी व जलद माध्यमातून घरोघरी पोहचवावेत असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कमिटीच्या शनिवारी (दि. 3 मार्च) वतीने सोशल मिडीया बाबत जागृती करण्यासाठी खराळवाडीतील राष्ट्रवादी शहर कार्यालयात अहमदनगर येथील संगणक तज्ञ योगेश फुंदे यांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, शहर प्रवक्ता फजल शेख, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, प्रदेश युवक सरचिटणीस संदिप चिंचवडे, प्रदेश युवक संघटक विशाल काळभोर, संघटक विजय लोखंडे, आनंदा यादव, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, युवक उपाध्यक्ष संतोष वाघेरे, आलोक गायकवाड, निलेश निकाळजे, शेखर काटे, मंगेश बजबळकर, लाला चिंचवडे, अमोल पाटील, मयुर जाधव, अमित बच्छाव, संघटक सचिव कविता खराडे, पुष्पा शेळके, ब्लॉक अध्यक्ष रशिद सय्यद, दिपक साकोरे, युवक उपाध्यक्ष चैतन्य चोरडिया, जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष यतिम पारेख, कार्यालयीन सचिव रामदास मोरे उपस्थित होते.
वाघेरे पाटील म्हणाले की, मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष व आजीमाजी मंत्र्यांवर विरोधी पक्षांनी बिनबूडाचे आरोप सोशल मिडीयातून केले. त्याला समर्पकपणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्तर देऊ शकले नाहीत. निवडणुक निकालानंतर सुप्रिया सुळे यांनी आढावा घेतला. त्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोशल मिडीयाचा वापर कमी करतात असे आढळले. त्यामुळे अशी सोशल मिडीया जनजागृती शिबीरे युवक प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर घेण्यात येणार आहेत.
यावेळी योगेश फुंदे यांनी शिबीरात सहभाग झालेल्या सर्वांना व्टिटरचे अकाऊंट ओपन करुन दिले व ते कसे वापरायचे याचे मार्गदर्शन दिले. व्टिटरच्या माध्यमातून आपले स्वत:चे विचार, तक्रार अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्री व उच्च अधिकारी, केंद्र व राज्य सरकारच्या विविध संस्था यांच्यापर्यंत कमी शब्दात क्षणार्धात पोहचविता येतात. तसेच फेसबुक, इंन्स्टाग्राम सभ्य पणाने कमी शब्दात, उच्च वैचारिक पातळीचे भान ठेवून आपले मत योग्य पध्दतीने कसे मांडावे याची माहिती दिली. सोशल मिडीयाबाबत कोणालाही कोणावरही दबावतंत्र वापरता येत नाही. संविधानाने दिलेला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना पुरेपूर वापरता येतो. मात्र, विकृत विचारांचे लोक ट्रोलींग करतात. तरी देखिल विचारांची लढाई विचारांनी लढायची याचे भान सर्वांनी ठेवावे. असेही फुंदे यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष वाघेरे पाटील यांच्या हस्ते फुंदे यांचा सत्कार करण्यात आला.