निर्भीडसत्ता न्यूज –
सिंधी बांधवांची संस्कृती अतिशय प्रेरणादायी आहे. सिंधी समाजाची एकता संपूर्ण देशात आदर्श मानली जाते. सिंधी बांधवांची कामाची चिकाटी वाखणण्याजोगी आहे. व्यावसायिक प्रगती आणि यशस्वी होण्यासाठी चिकाटी, कष्ट आणि कामातील सातत्याची आवश्यकता असते. या ‘त्रिसूत्रीचे’ सिंधी बांधवांकडून अनुकरण करावे, असे मत नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष व भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे यांनी व्यक्त केले.
पिंपरीतील सिंधू सेवा संगमचा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे उपस्थित बोलत होते. सिंधू सेवा संगम यांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अमित गोरखे म्हणाले, “मी सिंधी बांधवांशी खूप पूर्वीपासून जोडला गेलो आहे. सिंधी बांधवांची संस्कृती अतिशय प्रेरणादायी आहे. सिंधी समाजाची एकता संपूर्ण देशात आदर्श मानली जाते. कार्यक्रमात बोलविल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. आपल्या भाषणाचा शेवट त्यांनी ‘जय झुलेलाल’ असे म्हणून केला.
कार्यक्रमात सिंधी नाटक ‘मन मौजी दिवाने’ हे नाटक सादर करण्यात आले. सध्या समाजात वाढत असलेली बालगुन्हेगारी देशाला घातक आहे. त्यांना वेळीच बदलायला हवे. अशा प्रकारची कहाणी या नाटकात दाखविण्यात आली आहे. काही मुलांचा समूह वाममार्गाला जात आहे. एक मुलगी त्यांना सावरण्यासाठी मार्गदर्शक म्हणून त्या मुलांच्या जीवनात येते आणि त्यांना आपली सभ्यता, संस्कृती आणि आदर्श समजावून सांगत आदर्श जीवनाचा मार्ग दाखवते.
हा सांस्कृतिक कार्यक्रम डॉ. राजीव कृष्णनानी, सिंधू सेवा संगमचे प्रधान कमल मलकानी, सचिव सिरीचंद संगदिल आदींच्या वतीने आयोजित करण्यात आला. राम-शाम प्रो. स्टोअर्सच्या वतीने गौरव केटरर्सचे भोजन ठेवण्यात आले.