निर्भीडसत्ता न्यूज –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारचा 4 वर्षाचा कालावधी पुर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारचा 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारने अनेक उपलब्धी परिपूर्ण व लोककल्याणकारी योजना राबिवल्या आहेत. याची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड तर्फे खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, शहर प्रवक्ते अमोल थोरात, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे, उमा खापरे, मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, बाबू नायर, प्रमोद निसळ यांच्यासह पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार अमर साबळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारचा 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारने अनेक उपलब्धी परिपूर्ण व लोककल्याणकारी योजना राबिवल्या आहेत. मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत राबवलेल्या विविध योजनांचा फायदा देशातील 22 कोटी गरिबांना झाला असून, लोकाभिमुख सरकार कसे असावे, याचे उत्तम उदाहरण मोदी सरकार आहे.
पाच कोटीपेक्षा अधिक गरजू कुटूंबाना उज्वला योजने अंतर्गत गॅसजोडण्या देण्यात आल्या असून उच्च अर्थिक स्तरातील लोकांनी गॅस अनुदान सोडल्याने गॅसच्या किमती आटोक्यात आल्या आहेत. 2022 पर्यंत या देशातील कोणताही नागरिक झोपडपट्टीमध्ये राहणार नाही. या देशातील एक कोटी लोकांना घरे देण्यात आली आहेत. 10 कोटी कुटंबाना 5 लाख रूपये पर्यंत औषधपचर मिळणार आहे. नरेंन्द्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप झालेले नाहीत.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी उधोग, व्यापार आणि अर्थ व्यवस्थेबाबत मोठा कार्यक्रम हाती घेतल्याने या दोन्ही क्षेत्राना आलेली मरगळ दूर झाली आहे. त्यानंतर काही वर्षे प्रलंबित असलेला वस्तू व सेवा कर मोदींनी आणला. त्यामुळे उधोग क्षेत्राची परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारली आहे.
गेल्या चार वर्षामध्ये पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. विमानतळ, समुद्रीमार्ग याबरोबरच देशभरात विशेषकरून पूर्व भारतातील सातही राज्यात आणि अत्यंत दुर्गम भागात पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. तसेच केवळ प्रकल्प सुरू नसून प्रकल्पांसाठी देण्यात आलेला निधीदेखील मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. पंतप्रधान आवाससारख्या योजनांमुळे गरीब आणि सामान्य नगरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये मेट्रो, स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया, दिव्यांगाना क्रेंद्र शासनाची मदत, मुद्रा लोन, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत गरिबांना परवडणारी घरे, विमा कवच्, स्कील इंडिया व्दारे युवकांना प्रशिक्षण, खेळाडूसाठी अर्थसहाय्य, जन धन आणि जन सुरक्षा, स्वच्छ भारत योजना, मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्री जन औषधी योजना, मिशन इंद्र्धनुष्यव्दारे मुलांचे लसीकरण, सुकन्या समृध्दी योजना, इत्यादी अनेक योजना क्रेंद्र शासनाव्दारे पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्या आहेत.