निर्भीडसत्ता न्यूज –
वारकरी बांधवासाठी पुणे शहरात ‘वारकरी भवन’ उभारण्याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला असून, वारकरी भवनासाठी आरक्षित जागेचा वापर व्यावसायिक कामासाठी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.
२०१५ ला नाना पेठेतील रास्ता पेठ भागात वारकरी भवन उभारण्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. वारकरी भवनासाठी आरक्षित केलेल्या जागेचा वापर दुसऱ्या व्यावसायिक कामासाठी करता यावा म्हणून मनपामध्ये सत्ता बदल होताच प्रयत्न केले जात असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी एक पत्रक काढून केला आहे.
‘वारकरी भवन’ शहरापासून दूर मोहम्मदवाडी मध्ये नेह्ण्यात आला. लाखोंच्या संख्येने येणारे वारकरी हे शहराच्या मध्यवस्तीत राहतात. शहराच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या मोहम्मदवाडीच्या ठिकाणी वारकरी भवन उभारून वारकऱ्यांना त्याचा कितपत लाभ होईल हा प्रश्नच आहे. नुसतं वारकरी भवनाचं काय पण येऊ घातलेल्या वारीमध्ये दोन दिवस शहरात मुक्काम करणाऱ्या वारकरांच्या डोक्यावर पावसापासून संरक्षण करणारा मंडप देखील पडेल कि नाही यांची शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे.
या शहरालाच नाही तर महाराष्ट्राला पुण्यात वारकरी भवन उभे राहण्याची गरज वाटते. उभा महाराष्ट्र लाखोंच्या संख्येने पुणे शहरात असतो. शहराला लागून देहू आळंदी आहे. सातत्याने या भागात जाण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. या शहराला मोठा धार्मिक वारसा आहे अशा ठिकाणी वारकरी भवनाची इमारत सर्वात प्रथम उभी राहणे गरजेचे असताना सत्ताधारी भाजपा हज हाऊसच्या आरोळ्या जोर जोरात देत आहेत. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र शब्दात निषेध केला आहे.