निर्भीडसत्ता न्यूज –
भाजपने निवडणुकीपुर्वी मराठांसह अन्य समाजाला दिलेली आरक्षणाची आश्वासने पुर्ण करता आलेली नाहीत. आता ते न्यायालयाच्या आड लपून आश्रय घेवू लागले आहेत. काॅंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी भाजपची होती. परंतू, ते आरक्षण मुद्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप
पिंपरी चिंचवड शहर काॅंग्रेस पदाधिका-यांनी दिलेले राजीनामे मागे घेतल्याचे काॅंग्रेसचे प्रवक्ते डाॅ. रत्नाकर महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अख्तर चौधरी तसेच गौतम आरकडे, राजेंद्रसिंह वालिया, बिंदू तिवारी, माजी महिला प्रदेश अध्यक्षा शामला सोनवणे, सुदाम ढोरे, विष्णुपंत नेवाळे, बाळासाहेब साळुंखे, परशुराम गुंजाळ, शाम अगरवाल, लक्ष्मण रुपनर, नरेंद्र बनसोडे, मयुर जैयस्वाल, विशाल कसबे, शहाबुद्दीन शेख, किशोर कळसकर, तानाजी काटे, सज्जी वर्की, ॲड. क्षितीज गायकवाड, मकरध्वज यादव, ॲड. अनिरुध्द कांबळे, उमेश खंदारे, हिरा जाधव, चंद्रशेखर जाधव आदींसह उपस्थित होते.
दरम्यान शहर काॅंग्रेस पदाधिका-यांनी दिलेले राजीनामे मागे घेतल्याचे सांगून ते म्हणाले की, आगामी काळात कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी अधिक जोमाने, नव्या उमेदिने, निश्चित उद्दिष्ठ गाठण्याच्या हेतूने कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरुन सर्व पदाधिका-यांनी आपले राजीनामे मागे घेतल्याचे सांगितले.
यावेळी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले की, शहर कार्यकारिणीने केलेल्या सुचनांबाबत प्रदेश अध्यक्षांसह सर्व पदाधिका-यांनी सकारात्मक भुमिका घेतली. त्यानंतर राजीनामे मागे घेण्यास सांगितल्यामुळे राजीनामा मागे घेतला. पुढील काळात अधिक जोमाने पक्ष संघटना वाढवू असे ते म्हणाले.