औरंगाबाद |
नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटसमोर केंद्रीय राज्यमंत्री, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंची सभा सुरु असताना सूत्रसंचालन करणारे मिलिंद शेळके यांनी बाबासाहेबांचा नातू म्हणून घेणारा चोर आहे, असे उद्गार काढताच समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय संतप्त झाला आणि खुर्च्यांची मोडतोड करू लागला.