भटकंती कळसूबाईची |
कळसुबाई शिखरावर आयुष्यात एकदा तरी जावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते तसे माझेही स्वप्न होते, आणि हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले ते २६ जानेवारी २०१९, बकेटलीस्ट ऍडव्हेंचर गृपमुळे. कळसूबाई हा अकोला तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे. उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसबाई शिखराची उंची १६४६ मीटर (किंवा समुद्रसपाटीपासून ५४०० फूट) आहे. हे सर्वप्रथम महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.
यावेळी ठरवले कि नाईट ट्रेकला जायचे. आणि ठरल्याप्रमाणे २५ जानेवारीला रात्री ४ वाजता आम्ही एकूण १६ जणांनी कळसुबाई चढायला सुरवात केली . शिखरावर जाण्यासाठीची मुख्य वाट बारी गावातून जाते रात्रीचा ट्रेक असल्याने सर्वांच्या हातात टॉर्च होत्या, पण मी मात्र टॉर्च नसल्याने चांदण्यांच्या लक्ख प्रकाशात वाट बघत बघत पुढे जात होते. खरं तर हा देखावा म्हणजे चांदण्यांचा प्रकाश, चांदो मामा , मध्येच हवेची येणारी झुळूक आणि पाण्याचा आवाज हे सर्व कॅमेऱ्यात कॅप्चर करावे असे वाटले, पण कसले काय अंधार असल्याने फोटो क्लिअर आलेच नाही. वर वर जाताना ठिकठिकाणी २०० – ५०० इत्यादी आकडे मार्क केलेले मोठे दगड दिसत होते. पण तो तिथे भरायचा टोल नसून तिथली उंची दर्शवणारे आकडे आहेत हे आम्ही तात्काळ ओळखले..
शिखरापर्यंत जाताना चढाईचा बराचसा भाग हा दगडा-दगडांतूनच वाट काढत जायचा होता, पण ज्या ठिकाणी चढ अतिशय तीव्र आहे, त्या ठिकाणी सोयीसाठी लोखंडी शिडय़ांची व्यवस्था पूर्वीच करण्यात आलेली आहे. कॉलेजनंतरही आयुष्यात ‘व्हिजन चं महत्त्व कळत होतं ते असं! अशा तीन शिडय़ांपकी पहिली शिडी काही वेळाने लागली. आम्ही वेळेचे व्यवस्थापन आणि एकमेकांना सांभाळत वरच्या दिशेने जात होतो. शेअरिंग, केअरिंग आणि गिविंग याचा अनुभव पदोपदी येत होता, आणि त्याचे महत्वही पटत होते. फार वेगाने चाललोय, जरा निवांत जाऊ असं वाटताच ब्रेक घेत मध्येच ‘रनरेट कमीही करायचो. मोबाइल आणि डिजीकॅम सोबत असल्याने ठिकठिकाणी फोटो काढत निसर्गाला (आणि आम्हालाही) त्यात कैद करत होतोच. अर्थात जादूगार निसर्गाचे ते अप्रतिम सौंदर्य पाहून बहुतेकदा ते मनातच साठवून घ्यावेसे वाटत होते हेही खरेच! “करलों दुनिया मुठ्ठी मै”! च्या दुनियेत असतानांहि माणूस म्हणून आपण ‘निसर्गाच्या’समोर किती क्षुल्लक आहोत हे पदोपदी जाणवत होते आणि गंमत म्हणजे तो पराभवही आनंद देत होता/हवाहवासा वाटत होता. काही वेळाने दुसरीही शिडी पार करून वर निघालो.
तिथून पुढे निघताच काही मिनिटांतच ती तिसरी आणि त्यातल्या त्यात तीव्र चढण असलेली लोखंडी शिडी लागली. ती पार केल्यावर काही वेळातच ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो गड पार केल्याचा आनंद प्रत्येकाच्या मनात ओसंडून वाहत होता. कळसूबाई शिखरावर पोचलो, तेव्हा घडय़ाळातले काटे साधारण ‘वाजले की बारा’ असे होते. शिखरावर सर्वप्रथम दिसते ते कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर. सर्वानी मनोभावे त्या देवीला हात जोडून नमस्कार केला, सकाळचे ७.३० वाजले होते, प्रजासत्ताक दिन कळसुबाई शिखरावर साजरा करण्यासाठी तरुण तरुणीचे गृप्स मोठ्या संख्येने आले होते. त्यातही मुलींची संख्या अधिक होती. येथेही मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे चित्र दिसून आले. आम्ही सर्वानी आपला झेंडा धरून प्रजासत्ताक दिन साजरा केला. वर खूप धुके असल्याने आजूबाजूच्या आणि दरीच्या सौंदर्याचा अनुभव घेता आला नाही.
आम्ही सर्वानी प्रजासत्ताक दिन साजरा केला. वर खूप धुके असल्याने आजूबाजूच्या आणि दरीच्या सौंदर्याचा अनुभव घेता आला नाही . चढ चढताना एक मात्र नक्की लक्षात आले, आयुष्यात जे काही कमवायचे असेल ते सहज सहजी कुणालाही मिळत नाही , समस्या , चढ – उतार आणि संकटे यांचा सामना करत, केवळ आपणास आपल्या ध्येयापर्यंत पोहचायचे आहे हे मनात ठेऊन केलेले कोणतेही कार्य तुम्हाला तुमच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहचवतेस, आणि यानंतर मिळणार आनंद काही निराळाच असतो . खरंच मनातील ताण – तणाव घालवायचा असेल, मन शांती हवी असेल आणि पुन्हा लढण्यासाठी प्रेरणा हवी असेल तर नक्कीच ट्रेकिंग ला जायला हवे. जितकी उत्सुकता चालून अंतिम ध्येय गाठण्याची तितकीच कधी एकदा खाली उतरतो आणि परतीच्या प्रवासाला लागतो याचीही. तरी एकदा उतरण सुरू झाली की माणूस ‘डाउन टू अर्थ’ यायला वेळ लागत नाही याची अनुभूतीही आली. खरंच निसर्गासारखा गुरू नाही.
परतीचा प्रवास करताना आम्ही खऱ्या नायकांना/हिरॊना भेटलो, “कॉन्व्हॉय कंट्रोल क्लब” (दिव्यांग) चे संस्थापक, विनोद रावत, ज्यांनी हा क्लब ते एकटे असताना सुरु केला, पण आज त्याचे देशभरात ७ भाग आहेत. खर तर याना पाहिल्यावर, याची जिद्द पाहिल्यावर वाटले आहे हे जर कळसुबाई शिखर सर करू शकतात तर आपण तर चांगले धाडडकत असतानाही बऱ्याच वेळा हे – ते कारण देऊन बऱ्याच गोष्टी करायच्या टाळत असतो. त्यांचा गृप आम्हला आणि इतरांनाही संदेश देऊन गेला कि , कधीही नाही म्हणू नका, फक्त करा , तुमचे १०० % देण्याचा आणि चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा”. त्यांच ध्येय वाक्य आम्हाला एक वेगळीच प्रेरणा देऊन गेले, ते म्हणजे, “आम्ही धीमे असू शकतो परंतु आम्ही या प्रवाहात चालत राहू, जोपर्यंत आम्ही शिखरापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही.” या ट्रेक ने केवळ आम्हला प्रेरणा नाही तर आयुष्यातील संकटाशी लढण्याची हिंमतही दिली.
लेखन – रिता मदनलाल शेटीया
धनकवडी , पुणे