पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रहाटणीतील सामाजिक कार्यकर्ते मारूती थोपटे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
सामाजिक कार्यकर्ते मारूती थोपटे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, शहरात स्॒टेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत नागरिकांना वारंवार हात धुवावा लागतो. त्यामुळे पाण्याचा जास्त वापर होत आहे.
तसेच सध्या नवरात्रौत्सव सुरू असून पुढील महिन्यात दिवाळी आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना जास्तीचे पाणी लागते. ऑक्टोबर महिना संपत आल्यानंतरही पवना धरणा शभर टक्के पाणीसाठा आहे. दिवसाआड पाणीपुरवठा असल्याने नागरिकांना पाणी साठवून ठेवावे लागते. पाणी साठल्याने डेंगू व मलेरिया सारखे आजार होवू शकतात. त्यामुळे दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा दररोज सुरू करण्यात यावा अशी मागणी थोपटे यांनी केली आहे”.