मुंबई | निर्भीडसत्ता न्यूज
सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती आहे. त्यांच्या मृत्यू मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी नाटकं, सिनेमे आणि मालिकांमध्येही प्रदीप पटवर्धन यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आपल्या अभिनयानं त्यानी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठी सिनेसृष्टीत मानानं आणि अभिमानानं मिरवावं असं व्यक्तीमत्व. त्याचं नाव सिनेसृष्टीत आदरानं घेतलं जातं. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अश्या भावना व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या मोरूची मावशी या नाटकाने तर मराठी सिनेरसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. एक फुल चार हाफ (१९९१), डान्स पार्टी (१९९५), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२००९), गोला बेरीज (२०१२) आणि बॉम्बे वेल्वेट (२०१५), पोलिस लाईन (२०१६), नवरा माझा नवसाचा आणि १२३४ (२०१६) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.
नाटकांमध्ये काम करुन केलं प्रेक्षकांचे मनोरंजन
त्यांनी अनेक नाटकांत, चित्रपटांत आणि मालिकांमध्ये काम केलेले आहे. मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया, सखी प्रिय सखी, बायकोची खंत यांसारख्या नाटकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली.