सातारा | जावली
निर्भीडसत्ता न्यूज –
सातारा जिल्ह्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या आरपीआय सतारा जिल्हाध्यक्ष अशोक (बापू) गायकवाड यांना मंत्रीपदी संधी द्या, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, अशी मागणी केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.
जावळी तालुका आरपीआय अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी याबाबतचे निवेदन कार्यकर्त्यांच्यावतीने आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना दिले आहे.
दरम्यान अशोक बापू गायकवाड यांनी जिल्ह्यात पक्ष बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. केवळ पक्षच नाही तर सर्व समाज घटकांसाठी ते काम करीत आहेत, गत लोकसभा निवडणुकीत त्यांना 1 लाख मते मिळाली. ही त्यांच्या कामाची पावती आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्यामागे असलेला जनाधार सिद्ध केला आहे. त्यांना मंत्रीपदी संधी दिल्यास कार्यकर्त्यांना ताकद मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.