निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन पवना धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करत नाही शहरात “पाणी अडवा अन् नगरसेवकांची जिरवा” हे धोरण राबवते आहे. पाण्याची बोंब असताना सहा महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या पाणी धोरणाची अंमलबजावणी न केल्यावरून गुरूवारी (दि. 6) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. प्रभागातल्या या दैनिय अवस्थेवर संताप व्यक्त करत नगरसेवक तुषार कामठे यांनी पालिका प्रशासनावर निशाणा साधला.
नागरिकांनी अनधिकृतपणे घेतलेले नळजोड थांबविण्यासाठी, तसेच महापालिकेच्या उत्पन्नाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेने पाणीपट्टी दरवाढीबरोबर अनधिकृत नळजोडाबाबत धोरण तयार केले. मात्र, धोरणावर शिक्कामोर्तब होऊन सहा महिने उलटले, तरी ते महापालिका प्रशासनाने बासनात गुंडाळून ठेवले आहे. त्याबाबत नगरसेवक तुषार कामठे यांनी सभेत अनधिकृत टप-या व अतिक्रमणांवरून चर्चा करताना अनधिकृत नळजोड व शहरातील पाणीपुरवठ्याचा विषय मांडला.
नगरसेवक कामठे म्हणाले की, सध्या शहरात पाणीपुरवठा विस्कळीत असून नाकरिकांना त्रास होत आहे. दुषीत पाणीपुरवठा होत आहे. तसेच प्रभागात स्वच्छता केली जात नाही, घंटागाडी येत नाही. अधिकारी केवळ ठेकेदारांसोबत फिरण्यात दंग आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पाणीपट्टी दरवाढ आणि अनधिकृत नळजोड कायम करण्याच्या धोरणाला २८ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजुरी दिली. त्याची अंमलबजावणी पाणीपुरवठा विभाग व अधिका-यांनी सहा महिने उलटले तरी शहरविकासाबात अधिका-यांचे काहीच नियोजन नाही.