निर्भीडसत्ता न्यूज –
(नवी दिल्ली ) – पती हा पत्नीचा मालक नाही तसेच महिलांचा सन्मान होणे आवश्यक आहे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही महिला आणि पुरुषांना समान अधिकार असल्याने व्यभिचार संदर्भातील कायदा रद्द करत असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. घटनापीठातील 5 न्यायमूर्तींपैकी दोन जणांनी स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.
व्यभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम 497 रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी दिला आहे. पुरुष आणि स्त्री दोन्ही समान आहेत. त्यामुळे विवाहबाह्य संबंधात पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही असे नमूद करून विवाहबाह्य संबंध (व्याभिचार) हा गुन्हा ठरत नाही. असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचिकाकर्त्याने हा कायदा घटनाबाह्य असल्याचे सांगत कलम 497 रद्द करण्याची मागणी केली होती.