अहमदनगर – मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यात झालेल्या प्रदीर्घ सहा तासांच्या बैठकीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेत असल्याची घोषणा अण्णांनी केली आहे.
अण्णा हे महाराष्ट्राची आणि देशाची संपत्ती असून त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्यानंतर अण्णांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
Maharashtra: Anna Hazare ends his fast in Ralegan Siddhi, Ahmednagar. He was on a fast since the last six days for the formation of Lokpal at the Centre and Lokayuktas in the states. pic.twitter.com/YBaJGK0Tec
— ANI (@ANI) February 5, 2019
आज मंगळवारी उपोषणाच्या सातव्या दिवशी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष भामरे,गिरीष महाजन हे अण्णा हजारेंच्या भेटीसाठी राळेगणसिध्दीमध्ये पोहचले होते. त्यानंतर लोकपाल हा विषय सर्वोच्च न्यायालयात असून 13 फेब्रुवारीला त्यावर निवड समितीची बैठक आहे. त्याबाबतचं पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णांना देण्यात आलं. हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास अण्णांना देण्यात आला.