निर्भीडसत्ता न्यूज –
अटीतटीचा सामना असलेल्या भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली आहे, पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे.
पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत-पाकिस्ताच्या सामन्यावरील पावसाचे संकट काहीशे दूर झाले आहे, मात्र ढगाळ वातावरणामुळे धाकधुक कायम राहणार आहे. सध्यातरी खेळपट्टीवरील कव्हर्स हटवण्यात आले असून काही वेळात सामन्याला सुरुवात होईल.
इंग्लंडमधील मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात हा सामना होणार आहे. अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या या सामन्यात कोण बाजी मारणार यावर पैजा लागताना दिसत आहेत.
Match 22. India XI: R Sharma, KL Rahul, V Kohli, V Shankar, K Jadhav, MS Dhoni, H Pandya, B Kumar, K Yadav, Y Chahal, J Bumrah https://t.co/GuJZFwzObH #IndvPak #CWC19
— BCCI (@BCCI) June 16, 2019