पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. त्यांनी पक्षासाठी मोठे काम केले म्हणून माणुसकीच्या भावनेतून चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भावना राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे. लोकशाहित मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे, यात दुमत नाही. मात्र, हाच जर का निकष लावायचा असेल तर, पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आ. भालके यांचे निधन झाले होते. त्यावेळी भाजपला महाराष्ट्रातील राजकीय परंपरा दिसली नाही का, त्यावेळी माणुसकी कुठे गेली होती, असा सवाल माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.
पंढरपूरच्या पराभवाचा वचपा काढणारच, असा निर्धार व्यक्त करीत काटे म्हणाले की, भाजपला इतर पक्ष संपवायचे आहेत. त्यांना विरोध कऱणार्यांना ते ईडी, सीबीआयचा धाक दाखवून गप्प करतात. आजवर महाराष्ट्रात चार पोटनिवडणुका झाल्या. पंढरपूर-देगलूर, कोल्हापूर व अंधेरीची पोटनिवडणूक झाली. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदारांचे निधन झाल. त्यावेळी त्यांनी ते औचित्य दाखवले नाही. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला सुध्दा छळले. अशा परिस्थितीत चिंचवड व कसबा येथील आमदारांचे निधन झाले म्हणून त्यांना परंपरा व सभ्यता आठवते. भाजप हा अत्यंत संकुचित, जातीयवादी, मतलबी, स्वार्थी मनाचा राजकीय पक्ष आहे, अशी टीका काटे यांनी केली.