- वृक्षदाई संस्था व आपली सखीच्या वतीने 350 वटवृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
देहूगाव येथे वृक्षदाई संस्था आणि आपली सखी यांच्या वतीने वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त देहू गाव येथील श्री श्रेत्र भंडारा डोंगर येथे 350 महिलांच्या हस्ते 350 वटवृक्ष लावण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून पुण्याच्या सहाय्यक विभागीय आयुक्त पुनम मेहता, पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या उपप्रचार्या प्रेरणा कट्टे, अभिनेत्री मधुरा वेलणकर, महामेट्रोच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडयर संगीता तरडे, दि कल्याण सहकारी बँकेच्या उपमहाव्यवस्थापक मीना सावंत, संत साहित्य अभ्यासक कल्पना काशीद, देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, नंदादीप प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा नीता ढमाले यांच्या हस्ते आणि जगद्गगुरू इंग्लिश मीडियम स्कूल व इतर वृक्षदाई सदस्य महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षदायी संस्थेचे अध्यक्ष व संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे दहावे वंशज हभप शिवाजी महाराज मोरे यांनी देशी वृक्षांचे महत्त्व व त्यांच्यापासून होणारे फायदे आणि वृक्षदाई संस्थेच्या वतीने गेल्या पाच वर्षांमध्ये सुरू असलेल्या वृक्षसंवर्धनाची माहिती दिली. महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र देऊन सन्मानित करण्यात. यावेळी शोभा कदम, मनीषा राऊत, वृक्षमित्र पवन चौधरी, विकास बोराडे, संग्राम पाटील, मच्छिंद्र गवळी, अमोल गाडेकर, विलास बोराडे, शरद मेथे, राकेश वाघमारे, दिनकर जाधव, महेश चौधरी, राजेंद्र लोखंडे , सुरेश देसाई, हंसराज लांजेवार, सुनील सरवळे आदी उपस्थित होते. स्वागत सुभाष पाटील यांनी केले. प्रास्ताविक संतोष हगवणे यांनी केले. सतीश चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.