निर्भीड न्यूज –
देशाचं सैन्य जेव्हा राष्ट्रविघातक शक्तींशी लढत असतं तेव्हा त्यांनी पॅलेटगण वापरावी की पावा, हे सुप्रीम कोर्टानं ठरवू नये. हे ठरविण्याचा अधिकार फक्त लष्कर प्रमुखाला असावा. कारण देशद्रोह्यांना फक्त गोळ्याचं घालायच्या असतात. ज्या देशात देशद्रोह्यासोबत कस वागायचं हे सुप्रीम कोर्ट ठरवत त्या देशाला कुठलंही भविष्य नसतं,असे स्पष्ट मत अॅड नितीन आपटे यांनी व्यक्त केले.
जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 या विषयावर अॅड नितीन आपटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष चिंतामणी अभ्यंकर, सचिव रवींद्र भावे, खजिनदार संतोष जाधव, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष दीनानाथ जोशी यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र मिळून आम्हाला 65 वर्षांचा कालावधी लोटला तरी जम्मू-काश्मीरचा प्रश्न आजही आमच्यासाठी त्रासदायकच आहे. पूर्वीच्या सरकारची चुकीची धोरणे आजही आम्ही भोगतो आहे. आज असलेलं काश्मीरचं दुखणं म्हणजे यापूर्वीच्या नालायक राज्यकर्त्यांच देणं होय.
स्वातंत्र्यानंतर अवघ्या काही दिवसातच पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला. भारताने त्याला सडेतोड उत्तर देत पाक सैन्याला सळो की पळो करून सोडलं होत. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी हा विषय युनोत नेला नसता तर आज जम्मू काश्मीरचा बहुतांश प्रदेश भारताच्या ताब्यात राहिला असता. असेही ते बोलतना म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी तर आभार दीनानाथ जोशी यांनी मानले.