निर्भीडसत्ता न्यूज –
सरपंचानंतर आता महापौरांची ही थेट जनतेतून होणार निवड असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये बोलताना सांगितलं.सरकार याबाबत विचार करत असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
देशभरातील महापौरांची परिषद औरंगाबादमध्ये पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
उद्घाटन करण्यात आले.
त्यावेळी काही महापौरांनीच थेट निवडणुकीची मागणी केली होती. राज्यातील काही शहरं अतिशय मोठी आहेत. तिथे महापौरांची थेट निवडणूक घेणं शक्य नाही. मात्र, क आणि ड वर्ग महापालिकातील महापौरांची निवड जनतेने करण्याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.