निर्भीडसत्ता न्यूज –
मोशी कचरा डेपोमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबिवण्याबाबत शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विरोधाची भूमिका मांडली आहे. प्रकल्पाच्या निमित्ताने शहराचा कचरा पुन्हा मोशीत आणण्याचा प्रयत्न असल्याने त्याला विरोध असल्याचे त्यांनी म्हटले ला जाणार आहे. त्याला आपला विरोध असून मोशी, भोसरीकरांना अधिक त्रास सहन करावा लागणार असल्याची भूमिका आढळरावांनी मांडली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमवेत शुक्रवारी (दि. १३) झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राहूल कलाटे, महिला संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट उपस्थित होते. आढळराव म्हणाले, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पालिकेने राबविली आहे. मात्र, एनर्जीच्या निमित्त काढून पुन्हा सगळ्या शहराचा कचरा तिथे एकत्रित केला जाणार आहे. याआधीचे प्रकल्प पालिकेला निटपणे चालविता आलेले नाहीत. सध्या कंपोस्ट ५० टन होते, परंतु नंतर ३०० टनावर जाईल. त्यातून दुर्गंधी वाढणार असून ते मोशी, भोसरीकरांना सहन करावे लागणार आहे. जबरदस्तीने हा प्रकल्प लादल्याचा प्रयत्न झाल्यास पिंपरी सांडस, उरुळी कांचनसारखा विरोध मोशीतही केला जाईल.
आयुक्तांनी नाशिकफाटा ते मोशीपर्यंतच्या सहापदरी रस्त्यासाठी ८२ टक्के भूसंपादन झाल्याचे सांगितले आहे. या रस्त्याचे फेब्रुवारीपर्यंत काम सुरू होईल. त्याचबरोबर पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा सुमारे साडेतीन हजार कोटींचा प्रकल्प आहे. त्याचेही काम जानेवारीनंतर सुरू होणार असल्याचे आढळराव म्हणाले. सत्तेत असून नसल्यासारखे असल्याचे मत त्यांनी पुन्हा मांडले.
अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडविल्याचे मोठ-मोठे फ्लेक्स लागलेले आहे. याच प्रश्नांवरून चौथ्यांदा फ्लेक्सबाजी झाली आहे. याआधीही अनेकवेळा पेढे वाटले गेले. प्रत्यक्षात किती बांधकामे वाचतील, हे कोणी सांगत नाही. पालिका आयुकांनीही सावध भूमिका घेत अभ्यास सुरू असल्याचे सांगितल्याचे आढळराव म्हणाले. तर, बैलगाडा शर्यतीच्या बाबतीने सरकारने चुकीच्या मार्ग वापरल्याने त्यावरील बंदी कायम राहिल्याचे ते म्हणाले.