जयसिंगपूर / प्रतिनिधी
शरद वाघवेकर
जयसिंगपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली २७ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म महापरिषद पूज्य संघाच्या पावन सानिध्यात उत्साहात संपन्न झाली. वैशाली बौद्ध विहाराच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात धम्म बांधवांच्या प्रचंड उपस्थितीत झालेल्या या महापरिषदेत बिहार सरकारचा १९४९ चा कायदा रद्द करावा आणि बुद्धगया येथील महाबोधिविहाराचा ताबा बौद्धांच्या ताब्यात द्यावा या मागणीसह विविध ठराव करण्यात आले.
सकाळी १० वा धम्मज्योतीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर परिषदेचे उदघाटन कल्याणमित्र एस. पी. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष गणपती कांबळे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक व भिक्कू संघाचा परिचय भन्ते यशकश्यपायन यांनी करून दिला. रमाई उपासिका संघाने व संस्कार मंडळाच्या संचालकांनी याचना केली. भन्ते रतनज्योती यांच्यासह भन्ते उपगुप्तजी महाथेरो, भन्ते पग्यानंद, भन्ते डॉ. सत्यपालजी, भन्ते ज्ञानरक्षित, भदंत आर. आनंद, भन्ते रातांबोधी, भन्ते सुगत्पाल, भन्ते संबोधी, श्रामणेर विदिशा, भन्ते रेवतबोधी, आदी भिक्कूच्या धम्मदेसना झाल्या.
मंडळाचे अध्यक्ष गणपती कांबळे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक व भिक्कू संघाचा परिचय भन्ते यशकश्यपायन यांनी करून दिला. रमाई उपासिका संघाने व संस्कार मंडळाच्या संचालकांनी याचना केली. भन्ते रतनज्योती यांच्यासह भन्ते उपगुप्तजी महाथेरो, भन्ते पग्यानंद, भन्ते डॉ. सत्यपालजी, भन्ते ज्ञानरक्षित, भदंत आर. आनंद, भन्ते रातांबोधी, भन्ते सुगत्पाल, भन्ते संबोधी, श्रामणेर विदिशा, भन्ते रेवतबोधी, आदी भिक्कूच्या धम्मदेसना झाल्या.
पंचशील ध्वजारोहणाने परिषदेस प्रारंभ झाला. बोधीवृक्षास वंदन करण्यात आले. मंडळाचे सचिव विश्वास वाडीकर यांनी ठरावांचे वाचन केले. यावेळी श्रावस्ती दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शरद साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यद्रावकर, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील यद्रावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील आदी मान्यवरांनी परिषदेस उपस्थित राहून शुभेच्या दिल्या.
या परिषदेचे नियोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ, रमाई उपासिका संघ, युवा धम्म रक्षा दल, पंचशील पतसंस्था यांच्यासह तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले. सांगली, कोल्हापूर, सातारा, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागातील बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित कांबळे आणि सत्यजित शाक्य यांनी केले. आभार मंडळाचे अध्यक्ष गणपती पाटील, विश्वास वाडीकर यांनी मानले.