निर्भीडसत्ता न्यूज –
स्त्रीयांचे बचत गट १०० टक्के कर्जाची परत फेड करतात. म्हणून सरकारचा त्यांच्यावर विश्वास असल्याने शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मत अॅक्सिस बँक (पश्चिम भारत) च्या सहयोगी उपाध्यक्षा अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील पीडब्लूडी मैदानावर ४ ते ८ जानेवारी कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रेचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले.
जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता तापकीर, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक शारदा सोनवणे, सुनिता तापकीर, उषा मुंढे, कैलास बारणे, केशव घोळवे, अश्विनी जाधव, भिमाबाई फुगे, माई ढोरे, शर्मिला बाबर, प्रियांका बारसे, मिनल यादव, सारीका लांडगे, नम्रता लोंढे, स्विनल म्हेत्रे, यशोदा बोईनवाड, सिमा चौगुले, माधवी राजापुरे, निता पाडाळे, झामाबाई बारणे, सुवर्णा बुर्डे, अश्विनी बोबडे, सारीका सस्ते, करुणा चिंचवडे, अनुराधा गोरखे, आरती चौंधे, निर्मला कुटे, मनिषा पवार, अर्चना बारणे, आशा शेंडगे, सविता खुळे, हर्षल ढोरे, नामदेव ढाके, सुरेश भोईर, योगिता नागरगोजे, प्रा. सोनाली गव्हाणे, डॉ. वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, निकिता कदम, रेखा दर्शले, चंदा लोखंडे आदी उपस्थित होते.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, महिलांमध्ये बुद्धी कौशल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. परंतु त्यांना योग्य संधी मिळत नाही. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजार पेठ उपलब्ध करुन दिली असून महिलांच्या कलागुणांना व कौशल्याला वाव दिला आहे. त्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले की, महिलांमध्ये निसर्गतः कौशल्य असते. त्याचा फायदा या सगळ्यांच्या माध्यमातून समाजाला होत आहे. महिलांना केंद्रबिंदु मानुन ह्या सगळ्या घटकांना उत्तेजन देण्याचे काम महापालिका करते.
पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व सक्षम करण्यासाठी महापालिका सदैव कार्यरत आहे. मनपाच्या वतीने नुकताच अपंगासाठी दरमहा दोन हजार रुपये पेन्शन योजना चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे महिला बचत गट चांगले व्यावसाय करतील त्यांना आगामी काळात भरीव अर्थसहाय्य केले जाईल.