भिमा कोरेगाव प्रकरण हे सरकारचे अपयश
निर्भीडसत्ता न्यूज –
भीमा कोरेगाव प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश असून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.
भीमा कोरेगाव प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश असून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.
भीमा कोरेगाव प्रकरण हे सरकारचे अपयश आहे अशीच सर्वांची भावना आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात जातीय तणाव निर्माण झाला आहे. सरकार त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जातीय तणाव निर्माण करणा-यांवर सरकार कारवाई का करत नाही? त्यांना अटक का केली जात नाही? सरकारच्या मुकसंमतीने जाणिवपूर्वक हे सुरु आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.