निर्भीड न्यूज –
पवना धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. त्यामुळे येत्या 1 मेपासून पिंपरी-चिंचवड शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवार, दि. 20 एप्रिल रोजी महापालिका सभेपुढे प्रस्तावित केले. सर्वपक्षीय गटप्रमुखांच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
महापालिकेकडून सध्या 15 टक्के पाणी कपात लागू आहे. मात्र पवना धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. याच साठ्यावर शहरातील पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात कपात करणे आवश्यक आहे. त्यामुळे 1 मेपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव आयुक्तांनी महापालिका सभागृहापुढे सादर केला.