निर्भीडसत्ता न्यूज –
ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतक-याला सक्षम करत असताना रोजगारनिर्मिती, व्यावसाय या माध्यमातून देशाला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. गरीब, महिला आणि वृद्धांना डोळ्यांसमोर ठेवून सरकारने उत्तम योजना आणल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आमि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कोट्यवधी भारतीयांच्या आकांक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. गोर-गरिब वर्गाला अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळाला आहे. गरीब कुटुंबांसाठी आरोग्य योजना, आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आयुषमान भारत योजना राबवून सरकार देशवासीयांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लघु उद्योजकांसाठी ३ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
स्वच्छ भारत अभियानातून २ कोटी शौचालयांचे उदिष्ट, अमृत योजनेअंतर्गत ५०० शहरांना शुद्ध पाणी पुरवठा, स्मार्ट सिटीमधून शहरांचा कायपालट, देशभरातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण अशा विविध गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना निश्चितपणे होणार आहे. अनुसूचित जमातींसाठी ३९ हजार १३५ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. कर्मचा-यांसाठी ईपीएफमध्ये १२ टक्के योगदान दिले जाणार आहे.
हा अर्थसंकल्प अशादायी चित्र निर्माण करणारा आहे. आपली पिंपरी चिंचवड नगरी ही औधोगिक नगरी आहे. अर्थसंकल्पामधे उधोगांना महत्त्व, दिलासा देणार्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प सर्वसामान्याचे जीवनमान बदलणारा आहे.