विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण झाली पाहिजे. त्यातूनच त्यांचे व्यक्तीमत्त्व घडत असते, असे मत कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयात बारावी वाणीज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभात ते बोलत होते. या निमित्त विद्यार्थ्यांनी चिंचवडच्या गुरुकुलममधील विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप केले. यावेळी प्रा. एकनाथ कळमकर, माधव गायके, शंकर मोरे, शर्मिला भांबारे, माधुरी काकडे, सावकार गोरडे आदी उपस्थित होते.प्रा. अनिता तारळेकर, प्रतिक्षा पानकरे, शादाब बेग, सोनाली देशमुख यांनी संयोजनात पुढाकार घेतला.