निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिका निवडणुकांना वर्ष पूर्ण झाले कधी नव्हे ती सत्तेवर आलेल्या विनाअनुभवी भाजप सत्ताधार्यांना या वर्षभरात कोणतेही ठोस काम करता आले नाही फक्त विरोधी पक्षाच्या कामांचे श्रेय लाटून चमकोगिरी करण्याचे प्रकार सत्ताधार्यांनी चालवले असून हा मतदार शहरवासीयांचा घोर अपमान असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांनी केली आहे.
नगरसेविका शिलवंत-धर यांनी पुढे म्हटले आहे की १८ जुलै २०१७ च्या महापालिका महिला व बालकल्याण समिती सभेत बालवाड्यामधील बालकांना स्वच्छता किट देण्यासंबंधी प्रस्ताव त्यांनी सुचवला होता त्यास सर्वानुमते मंजुरीही देण्यात आली होती पण प्रत्यक्षात सत्ताधारी नगरसेविका व महापालिका अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात प्रभाग 20 मधील बालवाड्यामध्ये जाऊन स्वच्छता किट वाटण्याचा केवळ दिखावा केला याबाबत राष्ट्रवादीच्या इतर तीनही नगरसेवकांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. तसेच या कार्यक्रमाची केवळ फोटोबाजी करून प्रसिद्धी मिळवण्यापोटी महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करत आहे, असा आरोपही शिलवंत – धर यांनी केला आहे.