निर्भीडसत्ता न्यूज –
कोलंबो – निदहास चषक 20-20 स्पर्धेत आज भारताची विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना सुरु आहे. प्रथम फलंदाजी करीत श्रीलंकेने भारताच्या समोर 153 धावांचे आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित 19 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 152 धावा केल्या. श्रीलंकेकडून सलामीवीर कुसाल मेंडिस याने दमदार खेळी केली.
भारताने 153 धावांचा पाठलाग करीत चांगल्याप्रकारे सुरुवात केलेली आहे. भारताची विजयाच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. सध्या भारतीय संघाने 10 षटकांमध्ये 4 गडी बाद 85 धावा बनविल्या आहेत. भारताला विजयासाठी 54 चेंडूमध्ये 68 धावांची गरज आहे.