निर्भीडसत्ता न्यूज –
विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, असा शब्दात राज्याचे कौशल विकास व उद्योजकता, कामगार, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी शुक्रवारी (दि.२३) भाजपमुळे लोकशाही धोक्यात आल्याच्या विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
कासारवाडी येथील कलासागर हॉटेलमध्ये मराठवाड्यातील नागरिकांसाठी स्नेहमीलन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर पुढे म्हणाले की, लातूरमध्ये उपनगरीय रेल्वे डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून ४० हजार लोकांना रोजगार निर्माण होणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ६०० कोटी रुपयांची तरतूद केलेली असून जागा रेल्वेच्या ताब्यात देण्यात येत आहे.
त्याचबरोबर, विधानसभा सभापतींच्या विरोधात विरोधकांनी चुकीच्या मार्गाने अविश्वास ठराव आणला. त्याला भाजपमधील आम्ही सर्वांनी आक्रमकपणे विरोध दर्शविला.