सहायक पोलीस निरिक्षक जीवन माने यांचे नागरिकांना आवाहन…
जावळी | मेढा
निर्भीडसत्ता न्यूज –
सातारा जिल्ह्यात आणि जावळी तालुक्यात पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करून गुंडांच्या मुस्क्या आवळण्याचे काम केले आहे. शंभरहून अधिक गुंडांना तडिपार केले आहे. त्यात अवैध धंदेवाले, जुगार अड्डा चालविणारे, जुगार खेळणारे, गुंडगिरी, दहशत माजविणा-यांचा समावेश आहे. कार्यकर्त्यांचा बुरखा पांघरलेले खंडणीबहाद्दर गुंड मात्र तांत्रिक त्रुटीमुळे कारवाईपासून दूर राहिले आहेत. अशा खंडणीबहाद्दर कार्यकर्त्यांच्या मुस्क्या आवळण्यासाठी पोलिसांना नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक जीवन माने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. काही स्वयंघोषित कार्यकर्ते विविध कारणे पुढे करून सामान्य नागरिक, अधिकारी आणि व्यापारी यांच्याकडून जबरदस्तीने वर्गणी गोळा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार सहायक पोलीस निरिक्षक माने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. अशा स्वयंघोषित कार्यकर्त्यांकडून कोणाला जबरदस्तीने वर्गणी उकळण्याचा त्रास झाल्यास त्वरित पोलिसांकडे धाव घ्यावी. रितसर तक्रार नोंदवावी. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. याचाच अर्थ नागरिकांनी सहकार्य केल्यास खंडणीबदाद्दरांना रोखणे शकय होईल, असे पोलिसांनी सुचविले आहे.
शासकीय सेवेतील अधिकारी, पोलीस जेव्हा धडाकेबाज कामगिरी करतात, त्यावेळी त्यांना समाजाचं पाठबंळ आवश्यक असते. केवळ कायद्याचा बडगा दाखवून कारवाई करताना, मर्यादा येत असतात. कायद्याच्या चौकटीत काम करावे लागत असल्याने सर्व काही दिसत असूनही काही करता येत नाही. ही त्यांची हतबलता नागरिकांनी निर्भयता, सजगता दाखविल्यास दूर होवू शकते.
जावळी तालुक्यात विविध संघटनांची लेबल लावुन दुकानदारी करणाºया स्वयंघोषित कार्यकर्त्यांच्या टोळ्या सक्रिय आहेत. कधी जनआंदोलने करण्याचा इशारा तर कधी वरिष्ठांकडे निवेदन देवून तक्रार करण्याची भिती दाखवत पोलीस आणि शासन यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न या टोळया करत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या झुंडीप्रमाणे दोन तीन जण एकत्रित येऊन एकमेकाला आधार देत शासकीय कार्यालयांच्या आवारात वावरताना दिसून येतात. कार्यकर्ता असल्याचे भासवून विविध कारणाने पैसे उकळणाºया या स्वयंघोषित कार्यकर्त्यांचे बिंग फुटले आहे. समाजासमोर त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून त्यांचा दाना पाणी बंद झाला आहे. पैसे कमावण्याचे दुसरे कोणतेच साधन नाही. माहिती अधिकारात अर्ज दाखल करणे, एखाद्या प्रकल्पात भ्रष्टाचार झाला असल्याचे भांडवल करणे यातून मिळणाºया चिरिमिरीवर कुटूंबांचा उररनिर्वाह चालविणे असे अशा पद्धतीने स्वयंघोषित कार्यकर्ते जगत आहेत. अशाच पद्धतीने जगण्याची सवय लावून घेतल्याने त्यांना दुसरा पर्यायी मार्ग सापडत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा वर्गणी स्वरूपातील खंडणी वसूल करण्यालाच ते प्राधान्य देऊ लागले आहेत.
काही महिन्यांपुर्वी ते जरी दहशत माजवित होते, तरिही त्यांच्या मागे कोणीही कार्यकर्ता नाही, हे काही घटनांमधुन सिद्ध झाले आहे. ते आता कोणालाही आंदोलनाची धमकी देवू शकत नाहीत. त्यामुळे कोणी त्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही. दमदाटी करून ज्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत. त्यांनी न घाबरता, पोलिसांकडे धाव घ्यावी. निर्भयपणे तक्रार द्यावी. जेणेकरून खंडणीबहाद्दरांना वेळीच पायबंद घालता येईल.
‘‘म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, काळ सोकावता कामा नये’’
स्वयंघोषित कार्यकर्त्यांना घाबरून पैसे देत राहिलात तर तुमच्यासाठी पुढील काळ कठीण जाणार आहे. ‘‘म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, काळ सोकावता कामा नये’’. तुमच्या दुबळेपणाचा आतापर्यंत त्यांनी फायदा उठविला आहे. तुमचा दुबळेपणा हिच त्यांची शक्ती आहे. त्यामुळे घाबरून न जाता तक्रारी दाखल करा, अन् पहा काय घडतेय ते. रोजच्या दोनवेळच्या जवेणाची ज्यांना भ्रांत पडली आहे, अशांना घाबरू नये. ज्या नेत्यांच्या जिवावर ते धतिंग करत आहेत, त्या नेत्यांनासुद्धा यांचे कारनामे कळाले आहेत. त्यामुळे नेत्यांचा आता त्यांना पाठींबा उरलेला नाही.
एका ठिकाणाहून तडिपार झाल्यानंतर दुस-या शहरात बस्तान बांधलेले गुंड या स्वयंघोषित कार्यकर्त्यांनी गुरू मानले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली यांची वाटचाल सुरू आहे. नागरिकांनी निर्भयपणे अशा प्रवृत्तींविरूद्ध आवाज उठविला तर या स्वयंघोषित कार्यकर्त्यांची रवानगी थेट तुरूंगातच होणार आहे. चुकीचे काम करणा-यांना त्याची शिक्षा भोगावीच लागणार आहे. हे वास्तव आहे. पोलिसांनी केलेले आवाहन लक्षात घ्या, पुढे या, तक्रार द्या. सजग नागरिक म्हणुन कर्तव्य बजावण्याचे धाडस दाखवा. तुम्ही पाऊल उचलले तरच स्वयंघोषित कार्यकर्त्यांच्या जाचातून तालुक्यातील नागरिकांची सुटका होईल.