निर्भीडसत्ता न्यूज –
निगडीतील भक्ती-शक्ति चौकात पिंपरी-चिंचवड महापालिकेने १०७ मीटर उंचर राष्ट्रध्वज उभारला आहे. मात्र, या राष्ट्रध्वजाला महिन्यातून तीन ते चार वेळा खाली उतरविले जाते. त्यातून महापालिकेकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने महापालिकेने जनतेची माफी मागावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानात देशातील सर्वात उंच १०७ मीटर उंचीचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याचे बोलले जात होते. महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही हा राष्ट्रध्वज वारंवार खाली उतरवावा लागतो. याबाबतीत नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. हा राष्ट्रध्वजाचा देखील अवमान असल्याने महापालिकेने जनतेची माफी मागावी आणि राष्ट्रध्वज कायमस्वरुपी राहण्याबाबत प्रयत्न करावा, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.