निर्भीडसत्ता न्यूज –
वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरणरक्षणाच्या कार्यात ‘ट्री मँन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेल्या विष्णू लांबा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या देहुरोडजवळील हरीत घोरावडेश्वर प्रकल्पाला भेट दिली. तसेच, स्वयंसेवकांसोबत श्रमदान करून वृक्ष संवर्धनाबाबत मार्गदर्शनही केले.
सावरकर मंडळा्चया वतीने मागील आठ वर्षांपासून हरित घोरावडेश्वर प्रकल्प राबविण्यात येत आहे. आजअखेर आठ हजार झाडांची लागवड करून कठीण परस्थितीत मंडळाने पाच हजार झाडे जगविली आहेत. त्याचबरोबर देहुरोड येथे स्थानिक प्रजातीच्या दहा हजार रोपांची नर्सरी तयार केली आहे. ही रोपे विविध संस्थांना मागणी नुसार मोफत दिली जाणार आहेत.या प्रकल्पाला विष्णू लांबा यांनी रविवारी (दि. 13) आवर्जून या प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी तेथे हरित प्रकल्पासाठी स्वयंसेवकांसोबत श्रमदान करत वृक्षारोपण केले. तसेच, उपस्थित निसर्ग मित्रांना वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणाची गरज या विषयावर डोंगरावरच मार्गदर्शन केले. तसेच, नैसर्गिक व मानवी आपत्तीवर मात करून केल्या जात असेलल्या या कार्याबाद्दल अभिनंदनही केले.
या प्रसंगी सावरकर मंडळाचे सचिव भास्कर रिकामे, निसर्ग मित्र विजय सातपुते, रोहिदास जाधव, सुनील गुरव, प्रभाकर कारंडे प्रशांत बेंद्रे, दिपक पंडित, हेमंत थोरात, रवी मनकर, मनेश म्हस्के, राजेश देशमुख यांच्यासह ओम निसर्ग मित्र चिंचवड, चला मारु फेरफटका, पिसीसीएफ आणि इतर संस्थांचे कार्यकर्ते सहपरिवार श्रमदानासाठी उपस्थित होते.
विष्णू लांबा गेली 24 वर्षे वृक्ष संवर्धनासाठी काम करत आहेत. वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी 33 लाख वृक्षांची लागवड केली आहे. देशात हरित क्रांती रुजविण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान असून देशाचा ट्री मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. या कामात त्यांनी राजस्थानमधील उजाड होत चाललेल्या चंबळच्या खो-यातील दरोडेखोरांनाही वृक्ष लागवडीच्या कार्यात सहभागी करून घेतले आहे. जयपूरमधील एका कार्यक्रमात त्यांच्याशी सावरकर मंडळाच्या पदाधिका-यांची भेट झाली. तेव्हपासून हरित घोरावडेश्वर प्रकल्पांची माहिती असल्याने त्यांनी आवर्जून या ठिकाणी भेट दिली.